Navi Mutual Fund : फंड निवडीत परताव्याला प्राधान्य; नवी म्युच्युअल फंडाचा अहवाल

गैरसमज दूर करण्यासाठी आर्थिक साक्षरतेची गरज
priority to choose fund navi mutual fund report investment
priority to choose fund navi mutual fund report investmentSakal
Updated on

बंगळूर : देशातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये मोठी वाढ होत असून, बहुतांश गुंतवणूकदार फंडाची निवड करताना परताव्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे निरीक्षण नवी म्युच्युअल फंडाने अलीकडे केलेल्या अभ्यास अहवालात नोंदविण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांमध्ये काही गैरसमज असल्याचेही आढळले असून, त्यामुळे ते गुंतवणुकीपासून परावृत्त होत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरतेची गरज असल्याचेही अधोरेखित झाले आहे.

फंड निवडताना प्रत्येक दोन गुंतवणूकदारांपैकी एका गुंतवणूकदारांसाठी परतावा हे सर्वोच्च प्राधान्य असते. अॅक्टीव्ह आणि इंडेक्स फंड या दोन्हींसाठी हाच निकष लागू झाल्याचे आढळले आहे. इंडेक्स फंडाबाबत गुंतवणूकदारांमध्ये कमी माहिती असल्याचेही दिसून आले आहे.

priority to choose fund navi mutual fund report investment
Amfi Mutual Fund : ‘ॲम्फी’ ‘म्युच्युअल फंड’चा कर्ताधर्ता

अल्प शुल्क आणि मित्र तसेच कुटुंबाकडून मिळालेले सकारात्मक अनुभव यामुळे इंडेक्स फंडांना प्राधान्य दिले जाते, हे या अभ्यासातून दिसून आले आहे. तब्बल ८० टक्के गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या माहितीसाठी त्यांच्या सोशल नेटवर्क आणि ‘फिनफ्लुएंसर’वर अवलंबून असतात आणि गुंतवणूकीसाठी ही धक्कादायक बाब ठरु शकते.

म्युच्युअल फंड कंपन्या संकल्पना आणि गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्याबाबत जागरुकता निर्माण करून सामान्य गैरसमज दूर कर शकतात. त्यामुळे तरुण गुंतवणूकदारांना अधिक माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता येतील आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढेल, असे या अहवालात नमूद केले आहे.

priority to choose fund navi mutual fund report investment
Mutual Funds : ‘पीआयएफएए’मुळे गुंतवणूकदारांना मोठी मदत

व्यापक आर्थिक ज्ञान आवश्यक

गुंतवणूकदारांमध्ये काही गैरसमज असल्याचेही आढळले असून, त्यात म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी विस्तृत आर्थिक ज्ञान आवश्यक असते, हा मोठा गैरसमज असल्याचे दिसून आले आहे. तब्बल ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी व्यापक आर्थिक ज्ञान आवश्यक असल्याचे म्हटले आहे. हीच बाब संभाव्य गुंतवणूकदारांना गुंतवणूकीपासून परावृत्त करते.

गुंतवणूक सुरू करण्यासाठी एकरकमी मोठा निधी आवश्यक असतो, अशी धारणाही प्रत्येक तिघा संभाव्य गुंतवणूकदारांपैकी एका गुंतवणूकदारात आढळून आली असून, ती त्यांना गुंतवणुकीपासून परावृत्त करते.

गुंतवणूक अॅप बंद पडले, तर आपली गुंतवणूक सुरक्षित राहत नाही, अशी भीतीही ५० टक्के लोकांनी व्यक्त केली आहे. हे निष्कर्ष गुंतवणुकदारांना सक्षम करण्यासाठी आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमांची गरज अधोरेखित करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.