RBI: रिझर्व्ह बँक ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने भारतात परत आणणार; 1991 नंतर प्रथमच...

RBI Gold: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने देशात आणले आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. आता भारतातील परिस्थिती बदलत आहे.
India's Gold Reserves Boosted
India's Gold Reserves BoostedSakal
Updated on

RBI Gold: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने देशात आणले आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. आता भारतातील परिस्थिती बदलत आहे. एक काळ असा होता जेव्हा देशाचे सोने बाहेर ठेवावे लागत होते, पण आता भारत आपले सोने परत आणत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरबीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत सोन्याची नाणी भारतात आणली जातील. भविष्यात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआय देशाच्या तिजोरीतील सोन्याचे प्रमाण वाढवत असल्याचे सांगितले जात आहे.

India's Gold Reserves Boosted
RBI: आरबीआयने एडलवाईस ग्रुपवर केली मोठी कारवाई; समूहाच्या 2 कंपन्यांना ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

भारताच्या तिजोरीत सोने वाढत आहे

1991च्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा स्थानिक स्तरावर स्टॉकमध्ये समावेश करण्यात आला आहे. RBI कडे मार्च अखेर 822.1 टन सोने होते, ज्यापैकी 413.8 टन परदेशात होते. आता हे सोने हळूहळू भारतात आणले जात आहे. जागतिक आकडेवारीनुसार, अलिकडच्या वर्षांत सोने खरेदी करण्यात RBI ही आघाडीची मध्यवर्ती बँक आहे, ज्याने गेल्या आर्थिक वर्षात तिच्या साठ्यात 27.5 टन सोन्याची भर घातली आहे.

बँक ऑफ इंग्लंड (BOI) हे जगभरातील मध्यवर्ती बँकांसाठी फार पूर्वीपासून प्रमुख भांडार आहे. भारतही स्वातंत्र्यापूर्वीपासून आपले सोने लंडनच्या बँकांमध्ये ठेवत आहे. अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आरबीआयने काही वर्षांपूर्वी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. परदेशात सोन्याचा साठा वाढत असल्याने थोडे सोने भारतात आणण्याचे ठरले. तसेच भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.''

India's Gold Reserves Boosted
RBI Balance Sheet: आरबीआयचा ताळेबंद पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा अडीच पट मोठा; किती आहे संपत्ती?

सोने हा भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. इथे प्रत्येक घरात सोने असते आणि ते विकणे योग्य मानले जात नाही. परंतु 1991 मध्ये चंद्रशेखर सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी सोने गहाण ठेवले होते. मात्र, RBI ने 15 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 200 टन सोने खरेदी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.