IT Hiring: आयटी क्षेत्र मंदीच्या छायेत? 25 वर्षांत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत झाली घसरण

IT Hiring: वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 2.12 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.
recession effect on it sector as number of employment drops for first time in 25 years
recession effect on it sector as number of employment drops for first time in 25 years Sakal
Updated on

IT Hiring: 2023 हे वर्ष संपत आले आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जगभरात नोकर कपातीचे संकट निर्माण झाले होते. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, जगातील 2.12 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आर्थिक मंदीतून जात आहेत. त्याचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. जगासोबतच भारतावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

भारतातील 10 आघाडीच्या आयटी कंपन्या, ज्यात 20 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये घट होत आहे. लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2023 या नऊ महिन्यांत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या संख्येत घट झाली आहे.

आयटी तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबर ते मार्च हा साधारणपणे आयटी क्षेत्रात कमी कामाचा कालावधी असतो, परंतु जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत नोकऱ्या कमी होणे हे भारतीय आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत आहेत.

recession effect on it sector as number of employment drops for first time in 25 years
Mukesh Ambani: मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकी, 200 कोटीनंतर आता 400 कोटींची मागणी

मिंट या इंग्रजी न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, देशातील 10 आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या आकडेवारीवरून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस इत्यादी मोठ्या आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीच्या 10 आयटी कंपन्या 21.10 लाख कर्मचार्‍यांना रोजगार देत होत्या, मात्र सप्टेंबरपर्यंत त्या 20.60 लाखांवर आल्या आहेत.

recession effect on it sector as number of employment drops for first time in 25 years
IPO Listing: होनासा कंझ्युमर्सचा आयपीओ आज होणार खुला, तुम्ही तयार आहात ना?

25 वर्षात प्रथमच कामगारांची संख्या कमी झाली

गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड इत्यादी आयटी कंपन्यांमध्ये गेल्या 9 महिन्यांत 51,744 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि युरोपमधील मंदीमुळे भारतीय आयटी क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.