Tomato Price: स्वयंपाकघराचे बजेट बिघडले, टोमॅटोने गाठली 'शंभरी'; सबसीडी न देण्याची सरकारची भूमिका

Vegetables Price Hike: पावसाळा सुरू झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळत असतानाच या हंगामात महाग झालेल्या भाज्यांनी सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.
Tomato Price Hike
Tomato Price HikeEsakal
Updated on

पावसाळा सुरू झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळत असतानाच या हंगामात महाग झालेल्या भाज्यांनी सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. टोमॅटोचा दर आठवडाभरात 80 रुपये प्रतिकिलोच्या पुढे जाऊन 100 रुपयांवर पोहोचला आहे.

सध्या बाजारात टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपये आहे. उर्वरित भाज्याही 40 रुपयांच्या वर विकल्या जात आहेत, तरीही त्यांचे दर आठवडाभरापूर्वी जेवढे होते तेवढेच आहेत.

टोमॅटोचे भाव वाढण्यामागे हिमाचल प्रदेशात दररोज पडणारा पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच तेथून टोमॅटोची आवक अत्यल्प असल्याने आठवडाभरात टोमॅटोच्या भावात 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

जम्मूच्या डोंगराळ भागात टोमॅटोचे पीक अद्याप तयार झालेले नाही. अशा परिस्थितीत हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून टोमॅटोची आवक कमी झाल्याने त्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत.

Tomato Price Hike
म्युच्युअल फंड कधी विकावा?

दरम्यान टोमॅटोबरोबर इतर भाज्याही महागल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून भाज्या गायब झाल्या आहेत. सध्या सोयाबीन आणि सिमला मिरची 80 ते 100 रुपये, कोबी 80 रुपये, वांगी 60 रुपये, बटाटा 40 रुपये, तर कांदा 40 ते 50 रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे लोकांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे.

अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या ताटातून भाज्या गायब झाल्या आहेत. आता लोक लोणच्यासारखी भाजी खातात. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे वाईट दिवस सुरू आहेत, पण सरकारने आतापर्यंत यावर काहीच पाऊले उचललेली नाहीत.

Tomato Price Hike
नव्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

सबसीडी न देण्याची सरकारची भूमिका

या सर्व प्रकरणावर बोलताना ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये टोमॅटो, बटाटे आणि कांद्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अतिवृष्टीमुळे पुरवठा विस्कळीत झाला, ज्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत.

या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या अनुदानावर टोमॅटो विकण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. गेल्या वर्षी सरकारने ही उपाययोजना केली होती.

भारतात 283 लाख टन बटाट्यांचा साठा आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन असूनही देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. सप्टेंबरमध्ये नवीन पीक आल्याने कांद्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.