एखाद्या पक्षाशी आपली विचारसरणी जुळते का याचा कोणताही विचार न करता संधी दिसतेय ना, मग मारा उडी, असे सुरू झाले आहे.
पुण्यशीला भारतभूमीतील महाराष्ट्र नावाच्या अतिप्रगत, पुरोगामी अशा लौकिकास प्राप्त झालेल्या परगण्यात सांप्रतच्या काळात लोकशाही बळकटीकरणाचे प्रयोग सुरु आहेत. इतिहासात नोंद होणाऱ्या या चार-पाच वर्षांत जनतेचा कौल धाब्यावर बसवून बाजू बदलत सत्ताधीश होणे, नंतर या कृत्याचा बदला म्हणून पक्ष फोडणे, ज्या ताटात जेवलो त्यात माती ओतणे, आमदारांना पळवणे, तपासयंत्रणांचा वापर करुन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरणे, मग त्यांना ब्लॅकमेल करुन स्वपक्षात ओढणे असे सगळे न-नैतिक प्रयोग यथासांग पार पडले.