यंदाचं ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्ली इथं भरवण्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं केली आणि दिल्लीतील मराठी लोक आणि महाराष्ट्रातील साहित्यरसिकांकडून अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता झाली. ही स्वागतार्ह बाब.