- आशिष पाटकर, saptrang@esakal.com
पुढील वर्षी होणारे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाची ठिकाणे आणि त्यांच्या आयोजनातला गोंधळ, हे डोळ्यांसमोर तरळून गेले आणि आता या वेळी समोर काय वाढून ठेवले आहे या विचाराने अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.