भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णाच्या लीलांचं मोठं कौतुक केलं जातं. बाललीला करणारा कान्हा आणि गोपिका यांचं अद्वैत काही निराळंच. गोपिकांच्या हंडीतलं दूध-दही-लोणी चोरून, पळवून, हंडी फोडून आपल्या सवंगड्यांबरोबर ते चाखण्यातला आनंद जसा कान्हाला मिळत असे तसाच तो गोपिकांच्याही कौतुकाचा विषय असे. संत नामदेवमहाराजांनी आपल्या गवळणीत असं वर्णन केलेलं आहे :