- प्रा.विशाल गरड कित्येक सरकारे आली आणि गेली, तो शेतात काम करत होता. अतिवृष्टी झाली, दुष्काळ आला, तो शेतात काम करत होता. देशात बॉम्बस्फोट झाला, तो शेतात काम करत होता. देशात जातीय दंगली झाल्या, तो शेतात काम करत होता..देशात लॉकडाउन झाला तरी तो शेतात काम करत होता. राजकीय नेत्यांनी गैरव्यवहार केले, तो शेतात काम करत होता. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, तो शेतात काम करत होता. त्याचा कांद्याचा वांदा झाला अन् टोमॅटोचा चिखल झाला तरीही तो शेतातच काम करत होता. कारण तो हाडाचा शेतकरी होता. कोणतीही व्यावसायिक कंपनी किंवा कारखाना असू द्यात. दोनतीन वर्ष तोट्यात गेला की ती बंद पडून त्याला कुलूप लागते पण इथला शेतकरी मात्र त्याची शेती नावाची कंपनी वर्षानुवर्ष तोट्यात चालवतोय. पण त्याने ती कधी बंद पडू दिली नाही.तांबडं फुटतानाच, बरोबर भाकरी बांधून घेऊन, पोतडं गुंडाळलेल्या बाटलीत घरचं पाणी भरून, खांद्यावर चाबूक आणि हातात कुऱ्हाड घेऊन हा शेतकरी गुरांमागं माळरानावर वणवण भटकत असतो..स्वतःचे पोट भरण्याआधी त्याच्या गुराढोरांचं पोट भरणं त्याच्यासाठी जास्त गरजेचं असतं. म्हणूनच त्याची ही दिवसभराची ड्युटी तो प्रामाणिकपणे पार पाडतो. पावसाळ्यात डोंगरावर मुबलक गवत असतं पण उन्हाळ्यात ओसाड माळरानावर जनावरं सांभाळणे हे खरंच जिकिरीचे काम.दिवसभर उन्हाच्या कारात करपलेल्या माळरानावर जनावरांना काय खायला मिळत असेल ? कुणास ठाऊक ? पण कडबा विकत घ्यायची ऐपत नसल्यावर अशी भटकंती अटळ. कर्जाचा एक हप्ता भरण्यासाठी महिन्यातले असे कित्येक हप्ते शेतकरी राजा उन्हात राबतो. दूध डेअरीच्या तुटपुंज्या पगारीवर आणि कवडीमोल किमतीत विकलेल्या शेतमालाच्या पट्टीवर कर्जाचा डोंगर रेटण्याचा तो प्रयत्न करतो पण जिद्द हरत नाही. भले व्याज वाढलं तरी चालेल पण मी कर्ज बुडवणार नाही या शेतकऱ्याच्या प्रामाणिकतेची दखल कुठेच का घेतली जाऊ नये याची खंत वाटते. कधी कधी हाच चांगुलपणा त्याचा जीव सुद्धा घेतो..मला भेटणारा प्रत्येक शेतकरी चाळिशी ओलांडलेला असतो. अशातही शेतात राबण्याची त्याची धमक तरण्या पोराला लाजवेल इतकी जबरदस्त असते. ही शक्ती येते तरी कुठून तर याचं उत्तर आहे पोरीचं लग्न, मुलाचं शिक्षण, सण, वार, उत्सव, संसाराचा बारदाना आणि बँकेचे कर्ज याच गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्याला कष्टातून रिटायरमेंट देत नाहीत. जोवर डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येतंय आणि हात उचलतोय तोवर त्याचे पाय शेताकडं जात राहतात.देशातील प्रत्येक घटक संप करतो पण आपल्या शेतकरी राजानं मात्र त्याच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी स्वतःचा जीव झाडावर टांगणं पसंत केलं पण कधी संप केला नाही. शेतमालाला आणि दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलने तर त्याच्या पाचवीलाच पूजलेली पण अजूनतरी पेरणी न करण्याचा संप त्यानं केला नाही. .शेतकरी राजाने फक्त एक हंगाम जरी पेरणी केली नाही, तर देशाची अर्थव्यवस्था हादरून जाईल. शेतमालाची आयात केली तरी ते इथल्या मातीत उगवलेलं नसल्याने ते कितपत पचेल ? दुसऱ्यांच्या जिवावर देश कुठपर्यंत भाकऱ्या भाजेल. मुळात सुपीक शेतजमिनी आता शिल्लक राहिल्यातच किती ? याचा सर्व्हे व्हायला हवा.सध्या कमी वेळेत आणि कमी जागेत जास्त उत्पन्न देणाऱ्या हायब्रीड वाणांच्या जिवावर पावणेदोनशे करोड लोकांच्या पोटांची खळगी भरत आहे. एकोणिसाव्या शतकात शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच व्हायचा, पुढे तो उद्योजक होऊ लागला आणि आता मात्र मुलगा कुणाचाही असो त्याला नोकरदार होण्याचेच स्वप्न आहेत. आजही सर्वांत जास्त रोजगार देण्याचे सामर्थ्य शेतीत आहे. कमी होत जाणारे शेतकऱ्यांचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. आजची नवी पिढी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून शेती करण्याचं कसब शिकायला तयार नाही आणि त्यांचा बाप त्यांना शिकवायला तयार नाही. .जात्यात भरडत चाललेला शेतकरी सुपात असलेल्या सवंगड्यांना ओरडून सांगतोय, की शेतीधंदा तोट्यात जातोय. मग नव्याने शेती करायला कोण धजावेल ? याच शेतीला करिअर म्हणून बघणारे आणि यशस्वी झालेले काही अपवाद आहेत पण ते तुलनेने फार कमीच.शेतकऱ्याच्या जिवावर मोठ्या झालेल्या खते आणि बी-बियाणे कंपन्या त्यांच्या उत्पादनांची विक्री रोज करत असतात. त्याचा नफा त्यांना रोज मिळतो तरी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या शेवटी करतात पण ज्याला त्याचा शेतमाल विकायला चार महिने, सहा महिने तर कधी एक वर्ष वाट बघावी लागते तो शेतकरी मात्र आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी शेतमजुरांचा पगार दर आठवड्याला करतो. पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या पिकांची नासाडी होऊ नये म्हणून वेळप्रसंगी तो सावकाराकडून कर्ज काढतो पण मजुरांचे पैसै मात्र वेळेवर देतो. आज नाही तर उद्या फायदा होईल, आज नाही तर उद्या भाव येईल, यंदा नाही तर पुढच्या वर्षी साधेल या भाबड्या आशेवर तो मातीत घाम गाळत राहतो. .मी अशी कित्येक उदाहरणे पाहिली आहेत, जिथे शेतकऱ्याला शेतात चालत जावे लागते पण मजुरांना मात्र गाडीत आणावे लागते. इथे मजूर गाडीत येतात याचे दुःख नाही पण कधी कधी मजुरांचा रोजगार करून शेवटी शेतकऱ्याच्या हातात तिकिटाला सुद्धा पैसे उरत नाहीत, हेही वास्तव आहे.सध्या गावाकडे शेतकरी मुलाला कुणीच मुलगी द्यायला धजावत नाही. भले त्याचे उत्पन्न लाखात असले तरीही मुलींना नोकरदार किंवा व्यावसायिक नवरा हवाय. त्यामुळे कितीतरी अल्पभूधारक युवकांनी शेती विकून व्यवसाय थाटलाय, शेती विकून नोकरीसाठी पैसे भरलेल्यांची संख्या सुद्धा कमी नाही. वाडवडिलांची परंपरेने चालत आलेली शेती जर अशी शहरातील करोडपतींच्या घशात जाऊ लागली, तर भविष्यात मूळ शेतकरी संपुष्टात येतील. वर्षानुवर्ष शेतात राब-राब राबणाऱ्या या शेतकरी राजाची ही दैना कधी संपेल तेव्हा संपेल, त्याच्या पिकाला कधी हमीभाव मिळेल तेव्हा मिळेल पण तूर्तास तरी "स्वतःच्या रक्ताचं पाणी करत काळ्या आईच्या पोटाला पाझर फोडून आपल्या पोटाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकानेच सन्मानाची वागणूक देणे हिच काळाची गरज आहे." कारण तो जर खचला, तर उद्या आपल्या पोटाची खळगी भरणं अवघड होऊन जाईल.(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.).ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
- प्रा.विशाल गरड कित्येक सरकारे आली आणि गेली, तो शेतात काम करत होता. अतिवृष्टी झाली, दुष्काळ आला, तो शेतात काम करत होता. देशात बॉम्बस्फोट झाला, तो शेतात काम करत होता. देशात जातीय दंगली झाल्या, तो शेतात काम करत होता..देशात लॉकडाउन झाला तरी तो शेतात काम करत होता. राजकीय नेत्यांनी गैरव्यवहार केले, तो शेतात काम करत होता. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, तो शेतात काम करत होता. त्याचा कांद्याचा वांदा झाला अन् टोमॅटोचा चिखल झाला तरीही तो शेतातच काम करत होता. कारण तो हाडाचा शेतकरी होता. कोणतीही व्यावसायिक कंपनी किंवा कारखाना असू द्यात. दोनतीन वर्ष तोट्यात गेला की ती बंद पडून त्याला कुलूप लागते पण इथला शेतकरी मात्र त्याची शेती नावाची कंपनी वर्षानुवर्ष तोट्यात चालवतोय. पण त्याने ती कधी बंद पडू दिली नाही.तांबडं फुटतानाच, बरोबर भाकरी बांधून घेऊन, पोतडं गुंडाळलेल्या बाटलीत घरचं पाणी भरून, खांद्यावर चाबूक आणि हातात कुऱ्हाड घेऊन हा शेतकरी गुरांमागं माळरानावर वणवण भटकत असतो..स्वतःचे पोट भरण्याआधी त्याच्या गुराढोरांचं पोट भरणं त्याच्यासाठी जास्त गरजेचं असतं. म्हणूनच त्याची ही दिवसभराची ड्युटी तो प्रामाणिकपणे पार पाडतो. पावसाळ्यात डोंगरावर मुबलक गवत असतं पण उन्हाळ्यात ओसाड माळरानावर जनावरं सांभाळणे हे खरंच जिकिरीचे काम.दिवसभर उन्हाच्या कारात करपलेल्या माळरानावर जनावरांना काय खायला मिळत असेल ? कुणास ठाऊक ? पण कडबा विकत घ्यायची ऐपत नसल्यावर अशी भटकंती अटळ. कर्जाचा एक हप्ता भरण्यासाठी महिन्यातले असे कित्येक हप्ते शेतकरी राजा उन्हात राबतो. दूध डेअरीच्या तुटपुंज्या पगारीवर आणि कवडीमोल किमतीत विकलेल्या शेतमालाच्या पट्टीवर कर्जाचा डोंगर रेटण्याचा तो प्रयत्न करतो पण जिद्द हरत नाही. भले व्याज वाढलं तरी चालेल पण मी कर्ज बुडवणार नाही या शेतकऱ्याच्या प्रामाणिकतेची दखल कुठेच का घेतली जाऊ नये याची खंत वाटते. कधी कधी हाच चांगुलपणा त्याचा जीव सुद्धा घेतो..मला भेटणारा प्रत्येक शेतकरी चाळिशी ओलांडलेला असतो. अशातही शेतात राबण्याची त्याची धमक तरण्या पोराला लाजवेल इतकी जबरदस्त असते. ही शक्ती येते तरी कुठून तर याचं उत्तर आहे पोरीचं लग्न, मुलाचं शिक्षण, सण, वार, उत्सव, संसाराचा बारदाना आणि बँकेचे कर्ज याच गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्याला कष्टातून रिटायरमेंट देत नाहीत. जोवर डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येतंय आणि हात उचलतोय तोवर त्याचे पाय शेताकडं जात राहतात.देशातील प्रत्येक घटक संप करतो पण आपल्या शेतकरी राजानं मात्र त्याच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी स्वतःचा जीव झाडावर टांगणं पसंत केलं पण कधी संप केला नाही. शेतमालाला आणि दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलने तर त्याच्या पाचवीलाच पूजलेली पण अजूनतरी पेरणी न करण्याचा संप त्यानं केला नाही. .शेतकरी राजाने फक्त एक हंगाम जरी पेरणी केली नाही, तर देशाची अर्थव्यवस्था हादरून जाईल. शेतमालाची आयात केली तरी ते इथल्या मातीत उगवलेलं नसल्याने ते कितपत पचेल ? दुसऱ्यांच्या जिवावर देश कुठपर्यंत भाकऱ्या भाजेल. मुळात सुपीक शेतजमिनी आता शिल्लक राहिल्यातच किती ? याचा सर्व्हे व्हायला हवा.सध्या कमी वेळेत आणि कमी जागेत जास्त उत्पन्न देणाऱ्या हायब्रीड वाणांच्या जिवावर पावणेदोनशे करोड लोकांच्या पोटांची खळगी भरत आहे. एकोणिसाव्या शतकात शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच व्हायचा, पुढे तो उद्योजक होऊ लागला आणि आता मात्र मुलगा कुणाचाही असो त्याला नोकरदार होण्याचेच स्वप्न आहेत. आजही सर्वांत जास्त रोजगार देण्याचे सामर्थ्य शेतीत आहे. कमी होत जाणारे शेतकऱ्यांचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. आजची नवी पिढी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून शेती करण्याचं कसब शिकायला तयार नाही आणि त्यांचा बाप त्यांना शिकवायला तयार नाही. .जात्यात भरडत चाललेला शेतकरी सुपात असलेल्या सवंगड्यांना ओरडून सांगतोय, की शेतीधंदा तोट्यात जातोय. मग नव्याने शेती करायला कोण धजावेल ? याच शेतीला करिअर म्हणून बघणारे आणि यशस्वी झालेले काही अपवाद आहेत पण ते तुलनेने फार कमीच.शेतकऱ्याच्या जिवावर मोठ्या झालेल्या खते आणि बी-बियाणे कंपन्या त्यांच्या उत्पादनांची विक्री रोज करत असतात. त्याचा नफा त्यांना रोज मिळतो तरी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या शेवटी करतात पण ज्याला त्याचा शेतमाल विकायला चार महिने, सहा महिने तर कधी एक वर्ष वाट बघावी लागते तो शेतकरी मात्र आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी शेतमजुरांचा पगार दर आठवड्याला करतो. पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या पिकांची नासाडी होऊ नये म्हणून वेळप्रसंगी तो सावकाराकडून कर्ज काढतो पण मजुरांचे पैसै मात्र वेळेवर देतो. आज नाही तर उद्या फायदा होईल, आज नाही तर उद्या भाव येईल, यंदा नाही तर पुढच्या वर्षी साधेल या भाबड्या आशेवर तो मातीत घाम गाळत राहतो. .मी अशी कित्येक उदाहरणे पाहिली आहेत, जिथे शेतकऱ्याला शेतात चालत जावे लागते पण मजुरांना मात्र गाडीत आणावे लागते. इथे मजूर गाडीत येतात याचे दुःख नाही पण कधी कधी मजुरांचा रोजगार करून शेवटी शेतकऱ्याच्या हातात तिकिटाला सुद्धा पैसे उरत नाहीत, हेही वास्तव आहे.सध्या गावाकडे शेतकरी मुलाला कुणीच मुलगी द्यायला धजावत नाही. भले त्याचे उत्पन्न लाखात असले तरीही मुलींना नोकरदार किंवा व्यावसायिक नवरा हवाय. त्यामुळे कितीतरी अल्पभूधारक युवकांनी शेती विकून व्यवसाय थाटलाय, शेती विकून नोकरीसाठी पैसे भरलेल्यांची संख्या सुद्धा कमी नाही. वाडवडिलांची परंपरेने चालत आलेली शेती जर अशी शहरातील करोडपतींच्या घशात जाऊ लागली, तर भविष्यात मूळ शेतकरी संपुष्टात येतील. वर्षानुवर्ष शेतात राब-राब राबणाऱ्या या शेतकरी राजाची ही दैना कधी संपेल तेव्हा संपेल, त्याच्या पिकाला कधी हमीभाव मिळेल तेव्हा मिळेल पण तूर्तास तरी "स्वतःच्या रक्ताचं पाणी करत काळ्या आईच्या पोटाला पाझर फोडून आपल्या पोटाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकानेच सन्मानाची वागणूक देणे हिच काळाची गरज आहे." कारण तो जर खचला, तर उद्या आपल्या पोटाची खळगी भरणं अवघड होऊन जाईल.(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.).ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.