Nana Patole: सरकार शेतकरी विरोधी; राज्यात भीषण दुष्काळ.. मंत्री विदेश दौऱ्यावर, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole: सरकार शेतकरी विरोधी; राज्यात भीषण दुष्काळ.. मंञी विदेश दौरयावर, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patolesakal
Updated on

Satara News: राज्यात भिषण दुष्काळ असुन येतील शेतकरी यांनी अनेक वर्षा मुलाबाळा प्रमाणे सांभाळ केलेल्या शैकडो हेक्टर वरील मोसंबी व डाळींब बागा दुष्काळात होरपडुन जळुत जात आहेत.

तर दुसरी कडे पिण्याच्या पाण्यासाठी अबालवृध्दांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा बिकट परिस्थिती ही केंद्र व राज्या सरकारने नागरीकांना कोणत्याच प्रकारचा दिलासा दिला नसुन राज्याचे कृषि मंञी अभ्यास दौरयाच्या नावावर विदेशवारी करीत आहे. तरी मुख्यमंञी त्यांच्या मुळगावी आराम करीत आहेत आहेत असे महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतले.

ते कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान आडुळ ता. पैठण येथे शुक्रवारी (ता.३१) रोजी बोलत होते. त्यांनी आडुळ येथील अप्पासाहेब कोल्हे , नंदु जारे यांच्या शेतात जावुन पाण्या अभावी जळालेल्या मोसंबी बाग व रोपवाटीकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील शेतकरी यांच्याशी संवाद साधुन परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी कल्याण काळे, वजाहिद मिरझा, माजी नामदेव पवार, किरण पाटील डोणगावकर, विलास औताडे, माजी मंञी अनिल पटेल, विनोद तांबे, रविंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्री. पटोले पुढे म्हणाले कि, पैठण तालुक्यात आशियातील सर्वात मोठे माती चे धरण असुन देखील येथील शेतकरी व नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे द्रुदैव असुन "हर नल घर जल" हि योजना अजुन ही कागदावरच आहे.

केंद्र व राज्य सरकारचे दिवस भरले असुन जनतेत या सरकार विरुध्द खुप रोष आहे. दुष्काळात होरपडुन निघणारया तालुक्यातील शेतकरी यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडुन करण्यात आली नाही उलट बँका वसुलीसाठी तगादा लावीत आहेत. शेतकरयांचे प्रचंड नुकसान होवुन ही राज्याचे मस्तवाल मंञी अभ्यास दौरयाच्या नावावर जनतेच्या पैशावर मस्ती जिरवित आहेत. त्यामुळे जनताच केंद्रात येत्या ४ तारखेला सत्ता बदल करणार आहे तर राज्यातील मस्तीखोर सरकारला ही खाली खेचणार आहे.

असे सांगुन नुकसान झालेल्या शेतकरी यांना न्याय मिळवुन देण्यासाठीच कॉंग्रेसने हा दुष्काळ पाहणी दौरा काढला असुन विधानसभेत याबाबत सरकार प्रश्न विचारणार आहे. यावेळी भाऊसाहेब पिवळ, दत्तुकाका ठोबंरे, शुभम पिवळ, सरपंच बबन भावले, जब्बार शेख, शिवलाल राठोड, रामुनाना पिवळ, डॉ. नंदु वाघ, आजीम शेख, सुधाकर पिवळ, हाजी शेख, उपसरपंच अनिल मोरे यांच्यासह अनेक शेतकरी यांची उपस्थिती होती.

नाना पटोले हे पाहणी करीत असतांना त्यांनी येथील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचत कैफियत मांडली. शेतकरी यांनी सांगीतले कि आम्ही खरीप व रब्बीचा विमा भरला त्याची असुन नुकसान भरपाई मिळाली नाही, दुष्काळ आमच्या बागा वाळल्या तर अवकाळीने दोन्ही हंगामीतील पिकांचे अतोनात नुकसान केले यातुन लागवड खर्च ही निघाला नाही.

बँकांनी पिककर्जा साठी ही सिव्हीलची अट टाकली त्यात अनेक शेतकरी अपाञ झाले तरी थकबाकीदार शेतकरयांचे वसुलीसाठी खाते होल्ड (बंद) केल्याने इतर अनुदानाचे पैसे ही काढता येत नसल्याने जिव देण्याची वेळ आली असे भावनिक उद् गार यावेळी उपस्थित शेतकरी यांनी काढले तेव्हा नाना पटोले यांनी कोणीही खच्चुन न जाता आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल उचलु नये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातुन सर्वांना न्याय मिळवुन देण्यासाठी सक्षम आहोत असे सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.