कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात झालेल्या दोन टप्प्यांमधील मतदानात भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष जिंकण्याचा दावा करत नाहीत. त्यांचा संभ्रम वाढवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ‘अबकी बार चारशेपार’ हे धोरण पूर्णपणे उध्वस्त होताना दिसत आहे. ते चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याची परिस्थिती असल्याचे वास्तव वंचीत बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मांडुन स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढल्याचे सर्वेवरून दिसते असल्याची त्यांनी केली.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी डॉ. आंबेडकर आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात झालेल्या दोन टप्प्यांमधील मतदानात भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष जिंकण्याचा दावा करत नाहीत असे सांगुने डॉ. आंबेडकर म्हणाले, भाजप आणि कॉंग्रेसचा संभ्रम वाढवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ‘अबकी बार चारशेपार’ हे धोरण पूर्णपणे उध्वस्त होताना दिसत आहे. ते चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याची परिस्थिती असल्याचे वास्तव आहे. स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढल्याचे सर्वेवरून दिसते असल्याचेही त्यांनी सांगीतले.
सांगलीतून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा दिला होता याप्रश्नावर डॉ. आंबेडकर म्हणाले, चंद्रहार पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा तुम्ही अपक्ष लढा.
सर्व आखाड्यांचे संघटन करा. तर मी तुमच्या प्रचाराला येईल, असे आश्वासन मी त्यांना दिले होते. परंतु, ते अपक्ष लढले नाहीत. ज्या सांगली जिल्ह्यात ज्यांची काहीच ताकद नाही अशा शिवसेनेबरोबर जाऊन त्यांनी आपल्या पायावर दगड मारून घेतला घेतल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे तुल्यबळ उमेदवार विशाल पाटील यांना उमेदवारी डावलून भाजप व काँग्रेसचा इथेही छुपा अजेंडा असू शकतो का? यावर ते म्हणाले, त्याची शक्यता नाकरता येत नाही. कारण ‘कल्याण’मध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार हा खूप कमकुवत आहे. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाचा सामना करू शकत नाही. यावरून सर्वकाही स्पष्ट होते, असेही स्पष्टीकरण डॉ. आंबेडकर यांनी दिले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.