Relience EV : रिलायन्स घेणार इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री; टाटा-महिंद्राला टक्कर,अंबानी भावांमध्ये स्पर्धा वाढणार?

reliance electric vehicles plant with 250k annual capacity : अनिल अंबानींचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे.
reliance ev plant with 250k annual capacity
reliance ev plant with 250k annual capacityesakal
Updated on

Reliance EV plant : अनिल अंबानींचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे. कंपनीने नुकतीच रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी नोंदणी केली आहे. याचा अर्थ, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात टाटा मोटर्स आणि महिंद्राला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे.

दरवर्षी 2.5 लाख ईव्हीची क्षमता

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ईव्ही प्लांट उभारण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच लाख वाहनांची असेल. येत्या काही वर्षांत ही संख्या 7.50 लाख वाहनांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. याशिवाय, कंपनी 10 गिगावॅट तास (GWh) क्षमतेचा बॅटरी प्लांटही उभारणार आहे.

बीवायडीचे माजी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांचा समावेश

या मोठ्या प्रकल्पासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने चीनची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी बीवायडीचे माजी अधिकारी संजय गोपालकृष्णन यांना सल्लागार म्हणून जोडले आहे. त्यांच्या अनुभवामुळे रिलायन्सला या क्षेत्रात मोठी वाढ मिळण्याची शक्यता आहे.

reliance ev plant with 250k annual capacity
TATA SUV Car Launch : टाटा मोटर्सच्या 'कर्व' SUVची मार्केटमध्ये एंट्री; नव्या फीचर्ससह पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी पहिलीच कार

मुकेश अंबानी-अनिल अंबानी पुन्हा एकदा स्पर्धेत?

मुकेश अंबानी यांनीही बॅटरी निर्मितीचा प्लांट लावायचा असल्याची माहिती समोर आली आहे. टेस्ला कंपनीही भारतात प्लांट उभारण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही भावांमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा पहायला मिळू शकते.

reliance ev plant with 250k annual capacity
Car Launch in September : यंदाचा सप्टेंबर कार प्रेमींसाठी खास! लाँच होणार या ब्रँड कार,एकदा बघाच

भारतात ईव्ही मार्केट

सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण कारपैकी फक्त 2 टक्के कार इलेक्ट्रिक आहेत. सरकारचा उद्देश 2030 पर्यंत हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आहे. यासाठी सरकारने ईव्ही, बॅटरी आणि पार्ट्स निर्मितीसाठी 5 अब्ज डॉलर्सचा कार्यक्रम सुरू केला आहे.

टाटा मोटर्सचे वर्चस्व

सध्या, टाटा मोटर्स या क्षेत्रातील 70 टक्के वाटा असलेली सर्वात मोठी ईव्ही उत्पादक आहे. महिंद्रानेही अनेक ईव्ही मॉडेल्सचे प्रदर्शन केले आहे. मारुती सुझुकी आणि Hyundai 2025 मध्ये त्यांचे EV मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.