Ashadhi Wari 2024 : आळंदीच्या वारीला आहे जुनी परंपरा; आळंदीला कसं पोहोचाल अन् काय पहाल?

आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात.
how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
Updated on

आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. वारी ही एक घटना नसून तो एक सोहळा असतो. हा सोहळा अनुभवन्यासाठी प्रत्येक वारकरी चालू लागतो पंढरीच्या दिशेने. पण अनेकांना पंढरीला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे पांडुरंगाचे अनेक भक्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला आळंदीला येत असतात. तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आळंदीत पाहण्यासारखं काय आहे? आळंदीला पोहोचायचं कसं?आणि आळंदीचा नेमका इतिहास काय आहे.

पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (२९ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा १६ जुलैला पंढरीत पोचणार असून, मुख्य आषाढी एकादशी १७ जुलैला आहे.

how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
Ashadhi Wari 2024 :  संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान; २५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कुऱ्हाडे कुटुबांच्या हौश्या अन् बाजीला मिळाला मान

श्री तीर्थक्षेत्र आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.

वारकरी संप्रदयात आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.

how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
Ashadhi Wari 2024 : वारीत महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून का जातात? पाहा काय आहे महत्त्व

तर आळंदीचा इतिहास काय आहे?

चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.

तुम्हाला आळंदीला राहायचं असेल तर तिथं अनेक धर्मशाळादेखील उपलब्ध आहेत. तसेच, इतर प्रेक्षणीय स्थळेदेखील आहेत. त्यांना तुम्ही भेट देऊ शकता.

how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी चेन्नईवरून आणलीय छत्री, काय आहेत वैशिष्ट्ये

आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे

  • इंद्रायणी नदी

  • कृष्ण मंदिर

  • मुक्ताई मंदिर

  • राम मंदिर

  • विठ्ठल रखुमाई मंदिर

  • स्वामी हरिहरेंद्र मठ

  • छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर

  • जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था

आळंदीतील धर्मशाळा

  • देविदास धर्मशाळा गोपाळपूर

  • फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

  • घासवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

  • मुक्ताबाई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

  • माहेश्वरी धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

  • आगरी धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड

  • डबेवाले धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड

  • हरिहर महाराज धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड

  • विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगांव रोड

  • पाषाणकर धर्मशाळा

  • माई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड

how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
Ashadhi Wari : तुकाराम पालखी अन् ज्ञानेश्वर पालखी अशा दोन वेगळ्या पालख्यांच्या आयोजनामागचा इतिहास माहिती आहे का?

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर, उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी आणि देहूत अनेक वारकरी उपस्थित असतात.

तुम्हालाही आळंदीला जायचं झाल्यास तुम्ही कसं जाल?

  • आळंदीला जाण्यासाठी सर्वात स्वस्त प्रवास हा ट्रेनचा आहे. कोल्हापूरमधून यायचं झाल्यास. कोल्हापूर ते आळंदी थेट ट्रेन आहे.

  • नाशिकवरुन यायंच झाल्यास बस, कार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बसने आलात तर फक्त 40 मिनिटात आळंदीला याल. तर कारने आलात तर, नाशिक फाट्यावरुन 13 मिनिटात आळंदीला पोहचाल.

  • मुंबई वरुन आळंदीला पोहचण्यासाठी २ तासाचा कालावधी लागतो. मुंबई- खोपोली-कामशेत-पिंपरी चिंचवड यामार्गाने तुम्ही आळंदीला येऊ शकता.

  • पुणे ते आळंदी ही सर्वात स्वस्त ट्रेन ५१४३५ पुणे सातारा पॅसेंजर आहे. या गाडीला पुण्याहून आळंदीला जाण्यासाठी ३९ मिनिटे लागतात. ही ट्रेन पुण्याहून 18:10:00 वाजता निघते आणि 18:49:00 वाजता आळंदीला पोहोचते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.