T20 World Cup:16 वर्ष, 9 महिने अन् 5 दिवस...भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांचे हटके ट्विट; दिला खास सल्ला

भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांचे हटके ट्विट व्हायरल.
16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title
16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title
Updated on

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (29 जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने 7 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले. तब्बल 17 वर्ष 9 महिने पाच दिवसांनी भारताने दुसऱ्यांदा या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताच्या या विजयानंतर संघावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी हटके ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. (16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title )

दिल्ली पोलिसांनी भारतीय संघाच्या विजयानिमित्त ट्विटरवर एक पोस्ट केली जी सध्या चर्चेत आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

'आपण सर्वांनी 16 वर्षे 9 महिने 5 दिवस (52,70,40,000 सेकंद) भारताने आणखी एक #T20WorldCup जिंकण्यासाठी वाट पाहिली आहे. ट्रॅफिक सिग्नलवरही थोडा धीर धरूया. एकाद्या चांगल्या क्षणाची वाट पाहिली पाहिजे. काय म्हणता? हार्दिक अभिनंदन, #TeamIndia.'

16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title
T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

असं हटके ट्विट करत दिल्ली पोलिसांनी वाहनचालकांना खास संदेश वजा सल्ला दिला आहे.

दिल्ली पोलिसांच्या या ट्विटनंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले, 'व्वा, तुमची सोशल मीडिया टीम अप्रतिम आहे. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो हे खरे आहे. आणखी एका युजरने म्हटले, 'दिल्ली पोलिस, तुमचे ट्विट वेगळ्या स्तराचे आहेत. खुप छान.'

16 Years 9 Months & 5 Days Delhi Police Congratulates India In Unique Style On Winning 2nd T20 World Cup Title
T-20: विजयाने पवित्र झालेली बार्बाडोसची माती रोहितने चाखली; पाहा फोटो

यापूर्वी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळताना २००७ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. टी२० वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी असा कारनामा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडने केला आहे. वेस्ट इंडीजने २०१२ आणि २०१६ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला. तसेच इंग्लंडने २००९ आणि २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.