Independence Day 2023: जपानशी संबंधित आहे भारताचं स्वातंत्र्य; १५ ऑगस्टलाच का साजरा करतात स्वातंत्र्यदिन?

माउंटबॅटनच्या निर्णयानंतर, ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सने 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केले.
Independence Day
Independence Dayesakal
Updated on

आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. पण आपण कधी विचार केला आहे का की आपण स्वातंत्र्य दिन फक्त १५ ऑगस्टलाच का साजरा करतो? यामागचं कारण अतिशय मनोरंजक आहे आणि ते जपानशी संबंधित आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला त्यामागील ऐतिहासिक कारण सांगतो.

माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान अनेक वर्षे आणि महिन्यांच्या संघर्ष, कष्ट आणि अहिंसा मोहिमेनंतर अखेरीस ब्रिटीश संसदेनं ३० जून १९४८ पर्यंत लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणं अनिवार्य केलं. पण माउंटबॅटन यांनी तारीख पुढे सरकवली आणि १५ऑगस्ट १९४७ ही सत्ता हस्तांतरणाची तारीख निश्चित करण्यात आली.

Independence Day
Independence Day 2023: स्वातंत्र्य दिवसाच्या 'अशा' द्या खास शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी म्हणाले की, माउंटबॅटन यांनी स्वातंत्र्याची तारीख पुढे नेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून देशात रक्तपात किंवा दंगली होणार नाहीत. माऊंटबॅटन यांनी १९४८ पर्यंत वाट पाहिली असती तर ते हस्तांतरित करण्याची शक्ती उरली नसती. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याची तारीख म्हणून १५ ऑगस्टची निवड केली.

टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रीडम अॅट मिडनाईट या पुस्तकात असं म्हटलं आहे की, ही तारीख निवडण्यामागे एक प्रश्न होता, ज्याद्वारे त्यांना सांगायचं होतं की माउंटबॅटन हे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रधार होते. तारीख निश्चित केली आहे का असं विचारलं असता, ती लवकरच होईल, असं सांगितलं जात होतं. ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये घडेल असा अंदाज त्यांनी बांधला होता आणि त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्टची निवड केली. १५ऑगस्टलाच दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीला दोन वर्षे पूर्ण होत असल्याचं त्यांनी असं करण्यामागचं कारण सांगितलं.

Independence Day
Independence Day 1947 भारताआधी 'या' देशात भारताचा स्वातंत्रदिन साजरी करण्यात आला होता

माउंटबॅटनच्या निर्णयानंतर, ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सने ४ जुलै १९४६ रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक मंजूर केलं. अशा प्रकारे भारताने १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास सुरुवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.