चिमठाणे : मनमाड- इंदूर- रेल्वेमार्गास मंजुरी, पांझरा व तापी नदीवरील प्रकल्पांसह सुलवाडे- जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेमुळे मुबलक पाणी, राज्यात सहा राष्ट्रीय महामार्गांचा जिल्हा, अशी ओळख आदी पायाभूत सुविधांच्या विकासामुळे धुळ्याचे चित्र पालटणार आहे.
यात ‘इंडस्ट्री मॅग्नेट’मधील मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरनंतर त्यात आता धुळे जिल्ह्याची भर पडणार आहे. त्यामुळे विकासाकडे झेपावणाऱ्या शिंदखेडा मतदारसंघात मला घर मिळेल का, अशी विचारणा माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांना करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचाही विकास चितारला. (Dhule devendra fadanvis Daura)