Dhule News : गोपीनाथ मुंडे अपघात योजना अनुदान वाटपात दिरंगाई : आमदार कुणाल पाटील; तत्काळ निधीची मागणी

Gopinath Munde Accident Scheme : धुळे जिल्ह्यातील जवळपास ३७ प्रकरणांत लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, अशी तक्रार आमदार कुणाल पाटील यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली.
MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal
Updated on

Dhule News : महाराष्ट्र शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत लाभार्थ्यांना अनुदान वाटपात दिरंगाई होत आहे, धुळे जिल्ह्यातील जवळपास ३७ प्रकरणांत लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, अशी तक्रार आमदार कुणाल पाटील यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. योजनेंतर्गत तातडीने निधी उपलब्ध करा, अशी मागणीही केली. (Dhule Delay in Gopinath Munde Accident Scheme )

महाराष्ट्रात डिसेंबर-२०१९ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती. नंतर शासनाने योजनेत सुधारणा केली. त्यानुसार आता राज्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ लागू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस दोन लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते.

धुळे जिल्ह्यातील दोन वर्षांपासून जवळपास ३७ प्रकरणांत लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. अपघातात बळी पडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वारसदार गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात चकरा मारत आहेत. त्यापैकी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली भेट घेतली.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात चौकशी केली असता निधी उपलब्ध नसल्याचे समजले. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कृषिमंत्री मुंडे यांची सोमवारी (ता.१) भेट घेऊन त्यांना पत्र दिले. कृषिमंत्री मुंडे यांनी याबाबत प्रधान सचिव (कृषी) यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. (latest marathi news)

MLA Kunal Patil
New Criminal Laws : नवीन कायद्यांविरोधात वकिलांचे आंदोलन! जिल्हा न्यायालयासमोर जोरदार घोषणाबाजी

शेतकऱ्यांना आवाहन

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे, जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांना झालेल्या अपघातात ही योजना लागू होते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वकीलाकडे जाण्याची गरज नाही. ज्यांना या योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करायचा असेल किंवा दाखल प्रस्तावाबाबत पाठपुरावा करायचा असेल त्यांनी जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

MLA Kunal Patil
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’चे धुळ्यात स्वागत! राज्य शासनाच्या योजनेबद्दल शिवसेनेतर्फे आनंदोत्सव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.