Dhule Lagna Muhurat : उर्वरित मुहूर्तावर विवाहेच्छुकांची लगीनघाई! आषाढी एकादशीपर्यंत तिथी; मे मध्ये होता गुरूचा अस्त

Dhule News : आता जुळलेले अन राहिलेले विवाह मे महिन्यात गुरूचा अस्त असल्याने झाले नाहीत. मात्र जून महिना सुरू असल्याने आता विवाह लावण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.
At present, the last stage of marriage has started and before the marriage, the bridegroom carries the deity in the traditional way.
At present, the last stage of marriage has started and before the marriage, the bridegroom carries the deity in the traditional way.esakal
Updated on

कापडणे : गेल्या नोव्हेंबरपासून ते १५ जुलैपर्यंत एकसष्ट विवाह मुहूर्त आहेत. आता शेवटच्या टप्प्यातील विवाहांची लगीनघाई सुरु झाली आहे. सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे. तेव्हापासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाह विवाह ठप्प होतात. मुहूर्त नसतात. आता जुळलेले अन राहिलेले विवाह मे महिन्यात गुरूचा अस्त असल्याने झाले नाहीत. मात्र जून महिना सुरू असल्याने आता विवाह लावण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. (Dhule Marriage aspirants rush for rest of muhurat)

नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशी झाली. अन २९ नोव्हेंबरपासून विवाहाचे बार फुटले. आता पंधरा जुलै हा शेवटचा मुहूर्त आहे. सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यानंतर विवाह मुहूर्त नसतात. तसेच खानदेशी मंडळी शेती कामात व्यस्त होतात. आता उरलेल्या मुहूर्तावर विवाह लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मे महिन्यापासून ते जूनच्या अर्ध्या महिन्यापर्यंत गुरूचा अस्त होता. या काळात विवाह तिथी नव्हत्या. मे महिन्याची उन्हाळी सुटी असूनही नोकरवर्गाची गैरसोय झाली. त्यांना विवाहेच्छुकांचे विवाह लावता आले नाहीत. तर ज्येष्ठमध्ये मोठ्या मुलाचे व मोठ्या मुलाचे विवाह लावले जात नाहीत. आता आषाढमधील उर्वरित मुहूर्तावर हे विवाह होत आहेत. (latest marathi news)

At present, the last stage of marriage has started and before the marriage, the bridegroom carries the deity in the traditional way.
Rashid Khan : दुसरी धाव नाकारली, कर्णधार राशिदने बॅटच फेकली... एवढंच नाही अफगाणिस्तान संघाचे अनेक Video होतायत ट्रेंड

उरलेत केवळ आठ मुहूर्त

गेल्या वर्षभरात एकसष्ट विवाह मुहूर्त होते. आता केवळ आठच विवाह मुहूर्त शेष आहेत.

जून : २३, २४, २९, ३०

जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५

शेवटचा मुहूर्त १५ जुलैला

खानदेशात कार्तिकी एकादशी अर्थात तुलसी विवाहापासून सुरु झालेले विवाह आषाढी एकादशीपर्यंत चालतात. त्यानंतर चार महिने विवाह ठप्प असतात. विवाहांची जुळवाजुळव सुरु असते. मात्र पारंपारिकतेनुसार विवाह लावले जात नाहीत. तेव्हा जुळलेले विवाह पंधरा जुलैपर्यंत लावण्यासाठी विवाहेच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत.

At present, the last stage of marriage has started and before the marriage, the bridegroom carries the deity in the traditional way.
Moody’s: पाणीटंचाई भारताच्या प्रतिष्ठेला घातक; देशात सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता, मूडीजचा धक्कादायक अहवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com