Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal

Gurumauli Annasaheb More : ज्याचे विचार चांगले तो मनुष्य चांगला! गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : सद्गुरुंचे सामर्थ्य प्रचंड असते. ते बोलतील ते खरे होते. याला वाचासिद्धी म्हणतात. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घ्यावा.
Published on

Gurumauli Annasaheb More : सद्गुरुंचे सामर्थ्य प्रचंड असते. ते बोलतील ते खरे होते. याला वाचासिद्धी म्हणतात. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घ्यावा. परंतु परब्रह्म श्री. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी आणि पगार घ्यावा तसे हे होते. जे सुख चिरकाल टिकणारे नाही, कालांतराने नाश पावणारे आहे ते घेऊन उपयोग नाही. पैशासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन गुंतून राहते. ()

प्रापंचिक माणसाने पैसा साठविणे गैर नाही, पण पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे. पैसा चोराने चोरुन नेला तर रडत बसू नये किंवा कुणी मागायला आला तर ‘नाही’ म्हणू नये, त्याला काहीतरी द्यावेच., असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता.२७) सांगितले.

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, आपल्या प्रपंचाला जेवढा आवश्यक आहे तेवढा पैसा मिळाला की समाधान मानावे. आपल्याला अडचण नाही पडली म्हणजे आपण श्रीमंतच होत असे समजावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये.  (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : वितुष्ट आणायला कारण पैसाच : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे त्याला श्रीमंत, सावकार म्हणतात, ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणतात, ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणतात. परंतु सावकार कंजूष असेल, विद्वान गर्विष्ठ असेल, शेतकरी असाच दुर्गुणी असेल तर त्यांना मोठे म्हणता येत नाही. ज्याच्याजवळ सर्व गुण आहेत तोच खरा मोठा. सर्वगुण एका परब्रह्माच्या ठिकाणी असतात म्हणून परब्रह्माला ज्यांनी आपलेसे केले तेच खरे मोठे बनतात.

आपण त्यांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो चांगला आणि जिथे परब्रह्माचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय., असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : भगवंत ‘कर्ता’ या भावनेने संत कर्म करतात : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.