समाजमन : मुलींना बनवा कणखर अन् मुलांना भावनिक!

Latest Marathi Article : एकूणच महिला सुरक्षिततेची जबाबदारी ही फक्त महिलांचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची आहे, हे जोपर्यंत आपण मान्य करून त्याची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत या घटनांना आवर घालणे अतिशय कठीण होत जाईल, हे मात्र नक्की!
boy & Girl
boy & Girlesakal
Updated on

लेखक : अ‍ॅड. नितीन ठाकरे

सध्या महिला अत्याचाराच्या घटना माध्यमामधून वारंवार बघण्यात, ऐकण्यात येत आहेत. पुढारलेल्या समाजात आपण राहतो, असे समाजमन सध्या दिसत असताना या घटना घडणे म्हणजे आपण कुठेतरी कमी पडत आहोत, हेच दर्शविते. या घटनांमध्ये सर्व वयोगटांतील महिला पीडित आहेत, हे चित्रदेखील विदारक असेच म्हणावे लागेल.

प्रामुख्याने अलीकडे अल्पवयीन मुलींच्या बाबतीतही अनेकदा असे प्रसंग, घटना घडलेल्या दिसतात. एकूणच महिला सुरक्षिततेची जबाबदारी ही फक्त महिलांचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची आहे, हे जोपर्यंत आपण मान्य करून त्याची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत या घटनांना आवर घालणे अतिशय कठीण होत जाईल, हे मात्र नक्की! (article on Make girls tough and boys emotional)

महिलांची सुरक्षा हा सध्या देशात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या विषयाचे स्वरूपही मोठे आणि व्यापक होत आहे. त्यामुळे महिलांच्या संदर्भातील गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. महिला घराबाहेर सुरक्षित नाहीत. अन्य देशांतून येणाऱ्या महिला प्रवासी भारतात येण्यापूर्वी संशयाच्या भोवऱ्यात राहतात. कायदे आहेत, पण महिलांना हिंसेपासून वाचवण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय असायला हवेत, ज्याचे समाजाने काटेकोर पालन करायला हवे.

महिला सुरक्षेचा विषय गंभीर

जो बलवान आहे, त्याची या देशात पूजा केली जाते. मानवी जीवनात स्त्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती आपल्या आयुष्यात अनेक भूमिका निभावत असते. ती आई आहे, बहीण आहे, आजी आहे, पत्नी आहे, तरीही ती सुरक्षित नाही. सर्व वयोगटांतील महिला सध्या भीती आणि दहशतीच्या छायेखाली जगत आहेत.

रात्री घराजवळच्या दुकानात जायलाही महिला घाबरतात, अशी परिस्थिती आहे. आपल्यासारख्या देशात महिलांची सुरक्षा ही एक मोठी चिंता बनली आहे. ज्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना ‘समाजमना’त आहे.

विचारवंतांनी दिशा द्यावी

भारत सध्याच्या घडीला महिलांसाठी सर्वांत सुरक्षित देश नक्कीच नाही. दुर्गा, लक्ष्मी आणि काली या देवतांच्या पूजेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या देशात महिला असुरक्षित आहेत, या मुद्द्याबद्दल समाजातील विचारवंतांनी आकलन करून समाजाला दिशा द्यायला हवी. महिलांना सध्या त्यांच्या हक्कांविरुद्ध कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे.

आपण अशा घटना जितक्या जास्त होऊ देऊ, तितक्याच त्या वाढत जाणार आहेत. त्यामुळे आता या विषयांचा बंदोबस्त करणे काळाची गरज आहे. आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेबद्दल आपण नेहमीच बोलतो, चर्चा करतो. मात्र, जेव्हा देशातील महिलांसाठी दैनंदिन व्यवहार सुरक्षित करण्याचा विचार आपण करू, तेव्हाच एका यशस्वी राष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी करू शकू.

देवीच्या स्वरूपाची मात्र उपेक्षा

हिंसाचार आणि भेदभावामुळे महिलांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतीय परंपरेत दुर्गा, सती सावित्री यांना पूजले जाते. लोक या देवींची उपासना करतात, पण देवींचे स्वरूप असलेल्या महिला वर्गाची मात्र समाज उपेक्षा करतो. पूर्वी स्त्रिया घरांमध्ये बंदिस्त असायच्या.

शहरीकरणामुळे बंदिस्ततेचे बंध झुगारून त्या आता पुरुषांच्या बरोबरीने प्रतिभा सिद्ध करत आहेत. अगदी, रिक्षा-टॅक्सीचालकापासून ते बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीईओपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला कौशल्य व नेतृत्व सिद्ध करत आहेत. स्त्रिया घराबाहेर काहीही करू शकत नाहीत, हा विचार आता मागे पडला आहे. (latest marathi news)

boy & Girl
समाजमन : राष्ट्रीय एकात्मता रुजविणारा गणेशोत्सव

कौटुंबिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण

महिलेने चंद्रावर पाऊल ठेवले आहे, हे मान्य करायला हवे. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला ही केवळ जगभरातील महिलांसाठीच नाही, तर अंतराळवीर बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या इतर सर्व पुरुषांसाठीही आदर्श ठरली.

कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ आणि हत्या हे भारतातील महिलांवरील अत्याचाराचे सामान्य प्रकार आहेत. हुंडाबळी हा हत्येचा अंतिम प्रकार आहे. हुंडा ही परंपरा आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठी मुलींचे वडील सर्वस्व गमावतात. हुंड्याच्या मानसिकतेत बहुतांश भारतीय समाजमन अजूनही अडकून पडले आहे.

कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती अत्याचार हे एका जोडीदाराकडून दुसऱ्या जोडीदारासोबतच्या नात्यात घडतात. भारतात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. ७० टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडत आहेत. यामुळे नैराश्य येऊन आत्महत्यादेखील घडत आहेत.

सामाजिक सुधारणांना मोठा वाव

अनेक ठिकाणी मुलींचे लग्न लहान वयात लावले जाते. बालवधू संसारातील जबाबदाऱ्या समजून घेण्याइतपत परिपक्व नाहीत, हे या मुलींच्या पालकांना कधी कळेल, हा प्रश्नच आहे. ॲसिड फेकणे हा एक प्रकारचा हिंसक हल्लाच आहे. ज्यामुळे एका सुंदर मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

‘रिलेशनशिपमध्ये फसवणूक’ हा महिलांवरील आणखी एक गुन्हा आहे. सहजपणे संबंध तोडले जातात. अशा प्रकारची मानसिकता आणि वृत्तीला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या संदर्भातील सामाजिक सुधारणांसाठी आपल्याकडे मोठा वाव आहे. ती बदलाची प्रक्रिया आता सुरू व्हायला हवी.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

boy & Girl
समाजमन : जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे पर्यावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.