Nashik News : जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे वाढवलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाबाबत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. (Eknath Shinde statement Decision in interest of farmers soon)
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी ते नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर दहापट वाढवले आहेत. २०१८-१९ मध्ये बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी ५३८ रुपये होता.
नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी ५ हजार ४४३ रुपये, खरिपाच्या शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी १ हजार ८९०, रब्बीसाठी ३ हजार ७८० करण्यात आली आहे. एका झटक्यात दहापट झालेली ही दरवाढ बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. (latest marathi news)
मुख्यमंत्री शिंदे यांनी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही असे सांगत, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार करेल असे आश्वासन दिले आहे.
हाकेंचे आभार
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण १० दिवसांनंतर स्थगित केले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शुक्रवारी (ता. २१) आमची बैठक झाली. बैठकीत दोन समाजात तेढ निर्माण होवू नये, यासाठी चर्चा करण्यात आली. अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरविण्यात आले हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.