Nashik Rice Farming : दिंडोरीत भात लावणी अंतिम टप्प्यात! पूर्व पट्ट्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा

Nashik News : यावर्षी मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर सूर्याचा पुष्य नक्षत्राने गेल्या रविवारी (ता.२१) मध्यरात्री पासून भीज पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम बऱ्यापैकी येऊ शकेल असा अंदाज आहे.
Due to the rains, paddy cultivation work is going on in the villages of Bhanwad, Ware, Vanare in the western part
Due to the rains, paddy cultivation work is going on in the villages of Bhanwad, Ware, Vanare in the western partesakal
Updated on

दिंडोरी : तालुक्यात सर्वच भागात भिज पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात लावणीच्या अंतिम कामाला वेग आला आहे. यावर्षी मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर सूर्याचा पुष्य नक्षत्राने गेल्या रविवारी (ता.२१) मध्यरात्री पासून भीज पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम बऱ्यापैकी येऊ शकेल असा अंदाज आहे. (Nashik rice planting in Dindori in final stage)

दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील जानोजी, खेडगाव, वणीकसबे, राजापूर, जोपुळ, पालखेड, आंबे, वरवंडी, गणेशगाव, खतवड, ढकांबे, जऊळके दिंडोरी, मोहाडी,चिंचखेड, वनारवाडी, गणेशगाव, कुर्णोली, मातेरेवाडी, मावडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पावसाने समाधान आहे. पावसामुळे धरणांमध्ये व विहिरींमध्ये असलेल्या पाण्यात वाढ झाली आहे.

मात्र नदी नाल्यांना पूर येण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. पश्चिम पट्यातील भनवड चारोसा लखमापूर जांबुटके, उमराळे, वणीखुर्द, गांडोळा, निगडोळ, करंजवण, खेडले कोशिंबे वारे वनारे परिसरात या पावसामुळे भात नागली वरई आदीची लागवड आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. (latest marathi news)

Due to the rains, paddy cultivation work is going on in the villages of Bhanwad, Ware, Vanare in the western part
Onion Chawl Subsidy : शेतकऱ्यांनी घेतले कांदाचाळीचे 29 कोटी अनुदान! कृषी विभागातर्फे योजनेची अंमलबजावणी; मनरेगा बाबत उदासीनता

पूर्व पट्यात भुईमूग सोयाबीन

पूर्व भागात भुईमूग सोयाबीन पेरणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे. अंतर्गत मशागतीत द्राक्ष बागेत तण काढणे, फवारणी करणे, रासायनिक खते पिकांना देणे आशा कामाला वेग आला आहे. तालुक्यात पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले आहेत तरीही नदी नाले अध्याय कोरडे असल्याने तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना रिमझिम पावसाला सामोरे जावे लागले असून पाणी पातळी तीन ते चार फूट ओल गेली आहे. त्यामुळे अजूनही या भागात समाधान कारक पावसाची अपेक्षा आहे.

धरणांना प्रतिक्षा

पालखेड ओझरखेड तिसगाव पुणेगाव वाघाड करंजवण आदी धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत समाधान कारक वाढ झालेली नाही.तरी पश्चिम पट्यातील भागात भात लावणीच्या कामाला अंतिम टप्प्यात वेग आला आहे.

Due to the rains, paddy cultivation work is going on in the villages of Bhanwad, Ware, Vanare in the western part
Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.