Nashik Weather Update : दोन महिने उशिराने आगमन झालेल्या पावसाने पुन्हा दडी मारली आहे. ऑगस्टमध्ये लावलेल्या हजेरीमुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील साठा ६६.८९ टक्के झाला आहे. त्यामुळे सहा धरणे ओव्हरफ्लो झाली असून, त्यातून सुमारे १७ टीएमसीपेक्षा जास्त पाणी ‘जायकवाडी’कडे सोडण्यात आले आहे. जुलैमध्ये पाऊस रुसल्याने जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले होते. प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही बराच कमी झाला होता. (rain which arrived two months late again in district )