Rakhi Business : पावसामुळे राखीचा व्यवसाय निम्म्यावर; व्यापाऱ्यांची वाढली चिंता

ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. पर्यायाने राखीच्या व्यवसायाला तब्बल ५० टक्के फटका बसला आहे.
Rakhi Business
Rakhi Businesssakal
Updated on

नागपूर - ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. पर्यायाने राखीच्या व्यवसायाला तब्बल ५० टक्के फटका बसला आहे. शहरात ठोक व्यापाऱ्यांनी राखी विक्रीची दुकाने थाटली आहे. मात्र ग्राहकांची प्रतीक्षाच करावी लागत असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सणाला पावसाची किनार असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील राख्यांच्या ठोक विक्रेत्यांचा बाजार सजला आहे. येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील व्यापारी राख्या खरेदीसाठी येत असतात. या सर्वच भागात जुलै महिन्याच्या पंधरा तारखेपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. अद्यापही सर्वत्र पाऊस सुरू आहे.

त्यामुळे बाजारात राख्या खरेदीसाठी बाहेरगाव आणि इतर राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची अडचण झालेली आहे. तसेच मागीलवर्षीही राखीच्या काळातच पाऊस असल्याने बाजारातील वर्दळ कमी होती. परिणामी, अनेक स्थानिक व्यापाऱ्यांकडे मागील वर्षीच्या राख्या शिल्लक आहे.

त्यामुळेही बाहेरगाव आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून राखीची खरेदी कमी केली जात आहे. यापूर्वी ५० हजारांची राखी खरेदी करणारा व्यापारी आता फक्त २० ते २५ हजाराच्या राख्या खरेदी करीत आहेत. पाऊस असल्यास दुकान कुठे लावावे असा प्रश्नही किरकोळ व फुटपाथवर दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही राख्यांची खरेदी कमी झाली आहे. त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे. शहरात अंदाजे ४० कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय होत असतो. यंदा त्यात विक्रमी घट झालेली आहे.

तब्बल २० वर्षांपासून राखीचा ठोक व्यवसाय करतो. सलग दोन वर्षांपासून पावसाचा फटका या व्यवसायाला बसत आहे. कोरोनाच्या काळानंतर व्यवसाय वाढला होता, परंतु पावसाने उशिरा हजेरी लावल्याने राखीचा व्यवसाय मंदावला आहे.

- विराज सिंघवी, राखी व्यापारी

आर्थिक गणित बिघडले

बाजारात राख्याला मागणीच नसल्याने दरही स्थिरावलेले आहेत. ठोक व्यापाऱ्यांकडे राख्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या असल्याने त्याचे आर्थिक गणित बिघडलेले आहेत. यावर्षी स्वस्त आणि अधिक विक्री होणाऱ्या राख्यांना विशेष मागणी आहे. अहमदाबाद, सूरत, मुंबई, कोलकत्ता आदी भागातून राख्या विक्रीसाठी आणल्या जातात. लहान मुलांमध्ये टेडिबेअर, मोटी पतलू, डोरेमॉन, भीम आदी राख्यांना विशेष मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.