पर्यायी राजकारणाच्या नावाखाली स्वार्थी कार्यपद्धती, गणपती मिरवणुकीत दगडफेक; मोहन भागवतांनी कोणते मुद्दे मांडले?

RSS Chief Calls for Self-Defense and Cautions Against Disruption During Ganesh Visarjan Celebrations: नागपूर येथे झालेल्या १०० व्या विजयादशमी सोहळ्यात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी राजकीय स्वार्थाच्या धोक्यांवर भाष्य केले, गणेश विसर्जन दरम्यान अस्वस्थतेच्या काळात आत्मसंरक्षणाची आवाहन केली आणि सामाजिक एकते व स्थिरतेच्या गरजेवर जोर दिला.
RSS Chief Mohan Bhagwat addressing the Dussehra rally in Nagpur, emphasizing the importance of social unity and self-defense during times of unrest
RSS Chief Mohan Bhagwat addressing the Dussehra rally in Nagpur, emphasizing the importance of social unity and self-defense during times of unrest esakal
Updated on

नागपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यंदा संघ 100 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने या विजयादशमी सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या भाषणातून भागवत यांनी भारतीय समाजाला एकत्र येण्याची आणि सामूहिकपणे समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांचे देखील कान टोचले.

मोहन भागवत यांनी बहुदलीय प्रजातंत्रामध्ये सत्तेसाठी झालेल्या स्पर्धेवर भाष्य केले. त्यांचा असा दावा होता की, जर राजकारणात समाजाच्या एकतेपेक्षा व्यक्तिगत स्वार्थ अधिक महत्वाचा ठरला, तर हे देशासाठी धोकादायक ठरू शकते. याबाबत त्यांनी अनेक जागतिक घटनांचा संदर्भ दिला, जसे की 'अरब स्प्रिंग' आणि बांग्लादेशातील ताज्या घडामोडी. भागवत म्हणाले की, भारताच्या चारही बाजूंवर अशा प्रकारच्या कुप्रवृत्त्या वाढत आहेत, ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होत आहे.

त्यांनी तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्राबद्दल देखील चिंता व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, आजच्या युगात युवांना स्व गौरवाची जाणीव झाली आहे, आणि हे चालू ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. भारताला भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी सामाजिक समरसता आणि सद्भावना महत्त्वाची आहे, अशी त्यांनी चर्चा केली.

भागवतांनी जोरदारपणे स्वयंसंरक्षणाच्या महत्वावर लक्ष केंद्रित केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीच्या घटनांचे उल्लेख करताना, त्यांनी जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले. "पोलिस येईपर्यंत आपले रक्षण करा," असे त्यांनी स्पष्ट केले. हे लक्षात घेऊन त्यांनी भारतीय समाजाला चेतावणी दिली की, कट्टरपंथी प्रवृत्त्या सक्रिय आहेत आणि त्यामुळे हिंदू समाजाने एकत्र येऊन आपली रक्षा करण्याची आवश्यकता आहे.

त्यांनी भारताच्या सामरिक स्थितीवर भाष्य करताना, "काहींना भारत यशस्वी होऊ देऊ इच्छित नाहीत," असे सांगितले. भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करताना, त्यांनी विचारले की, "भारत पुढे जाऊ नये, अशी काही लोकांची इच्छा आहे का?"

भागवतांनी सांस्कृतिक एकतेची महत्त्वता अधोरेखित केली, तसेच विविधतेच्या बाबतीत असंतोष निर्माण न करण्याचे आवाहन केले. "सर्वांनी मिळून एकत्र राहून समाजाच्या समस्यांवर काम केले पाहिजे," असे त्यांनी सांगितले.

RSS Chief Mohan Bhagwat addressing the Dussehra rally in Nagpur, emphasizing the importance of social unity and self-defense during times of unrest
Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

बहुपक्षीय लोकशाहीतील राजकीय स्पर्धा-

मोहन भागवत म्हणाले, बहुपक्षीय लोकशाहीतील शासन प्रणालीमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी दलांमध्ये स्पर्धा असते. जर समाजातील छोटे स्वार्थ, परस्पर सद्भावना किंवा राष्ट्राची एकता आणि अखंडता याहून अधिक महत्वाचे झाले. किंवा दलांच्या स्पर्धेत समाजाची सद्भावना आणि राष्ट्राचा गौरव गौण मानला गेला, तर अशा दलीय राजकारणात एक पक्षाची मदत करून पर्यायी राजकारणाच्या नावाखाली आपल्या स्वार्थी कार्यपद्धतीला पुढे आणणे हे राजकारणात सामान्य झाले आहे.

ही कल्पित कथा नसून, अनेक देशांमध्ये ही वास्तविकता आहे. पाश्चात्य जगातील प्रगत देशांमध्ये या मंत्रविप्लवामुळे जीवनाची स्थिरता, शांती आणि कल्याण संकटात आहे. तथाकथित "अरब स्प्रिंग"पासून ते बांग्लादेशातील ताज्या घटनांपर्यंत, या पद्धतीच्या कामगिरीचे स्पष्ट उदाहरण मिळते. भारताच्या चारही बाजूंना, विशेषतः सीमावर्ती आणि जनजातीय लोकसंख्येच्या प्रदेशांमध्ये अशा कुप्रयासांचे प्रमाण वाढले आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

RSS Chief Mohan Bhagwat addressing the Dussehra rally in Nagpur, emphasizing the importance of social unity and self-defense during times of unrest
Raj Thackeray: "तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांचा वचपा काढा, ही क्रांतीची वेळ मला संधी द्या" राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.