Nagpur Crime : व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने मानसिक तणावातून संपविले जीवन; मृतदेह सापडला कुजलेल्या अवस्थेत

विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) विद्यार्थी वसतीगृहात राहणाऱ्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्याने अनुत्तीर्ण झाल्याने मानसिक तणावातून संपविले जीवन.
Divyunshu gautam
Divyunshu gautamsakal
Updated on

नागपूर - विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) विद्यार्थी वसतीगृहात राहणाऱ्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्याने अनुत्तीर्ण झाल्याने मानसिक तणावातून गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी (ता.३०) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास खोलीत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. खोलीतून दुर्गंधी आल्याने ही घटना उघडकीस आली. दरम्यान या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

दिव्‍यांशू रोहितकुमार गौतम (वय २२, रा. परोरा, बिहार) असे युवकाचे नाव आहे. तो कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकत होता. एका महिन्यांपूर्वी झालेल्या परीक्षेत त्याचे अनेक विषयांमध्ये तो अनुत्तीर्ण झाला होता. त्यामळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेकडून फेर परीक्षा घेण्यात येते. ती देण्यासाठी तो वसतिगृहात थांबला होता.

वसतिगृहात कमीच मुले होती. दरम्यान २६ मे रोजी परीक्षा संपली. पण पेपर चांगले न गेल्याने तो तणावात होता. त्यानंतर दिव्यांशूने २९ तारखेला रेल्वेचे तिकीट काढले असल्याने त्याने दोन दिवस अधिक राहण्याची परवानगी प्रशासनाला मागितली होती. २७ तारखेला सांयकाळी तो दिसेनासा झाला. २९ ला तो घरी येण्यासाठी निघणार असल्याने कुटुंबीयांनी त्याला फोन केला.

मात्र, तो लागला नाही. आजही सकाळी फोन लागत नसल्याने त्यांनी याबाबत व्हीएनआयटी प्रशासनाला माहिती दिली. दरम्यान गुरुवारी सकाळी आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना त्याच्या खोलीतून दुर्गंधी आल्याने तेथील गार्डने दार तोडून आत प्रवेश केल्यावर त्याचा मृतदेहच जमिनीवर कुजलेल्या अवस्थेत आढळला. या धक्कायक घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविला.

दरम्यान त्याने गळफास घेतल्यावर दोन दिवसात वजनाने कपडे फाटून मृतदेह खाली पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

‘माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही’

मानसिक तणावात असलेला दिव्यांशू खोलीत आल्यावर त्याने आपला एका नोटबूकवर ‘माझ्या मृत्यूला कुणाही जबाबदार नसल्याचे लिहून ठेवल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. पोलिसांनी त्याचे रेकॉर्डही तपासले. त्यात तो सतत अनुत्तीर्ण असल्याचे आढळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.