Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची पारा चढत असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे वेळ देत नसल्याची खंत व्यक्त करत वाशिमच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्र लिहून याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शिवसेना (उबाठा) पक्षाला धक्का बसला आहे.