Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

Jammu Kashmir Assembly Election Exit Poll Result: जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसंबंधी एक्झिट पोलचे अंदाज बाहेर येऊ लागले आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील 90 विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यात मतदान घेतले आहे. हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्काबसण्याची शक्यता आहे.
EXIT Poll
EXIT Poll Esakal
Updated on

Jammu Kashmir Assembly Election Exit Poll Result: जम्मू आणि काश्मीरमध्ये मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. येथे 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे तर 25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. 1 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान विधानसभेच्या 90 जागांवर मतदान पूर्ण झाले. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यामुळे आता लोकांच्या नजरा 8 ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. या निवडणुकीचे आता एक्झिट पोल निकाल समोर येत आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये, रिपब्लिक-मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-एनसी आघाडीला 28-30 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 28-30 जागा मिळताना दिसत आहेत. पीडीपीला 05-07 जागा मिळतील तर इतरांना 8-16 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 23-27 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस-एनसी आघाडीला 46-50 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर इतरांच्या खात्यात 4-6 जागा आणि पीडीपीच्या खात्यात 7-11 जागा येण्याची शक्यता आहे.

EXIT Poll
Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

इंडिया टुडे-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी आघाडीला बहुमत मिळत असल्याचे दिसते. एक्झिट पोलनुसार, 90 जागांच्या राज्यात काँग्रेस-एनसी आघाडीला 40-48 जागा, भाजपला 27-32, पीडीपीला 6-12 आणि इतरांना 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरबाबत दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार भाजपला २०-२५ जागा, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला 35-40 जागा, पीडीपीला 4-7 आणि इतरांना 12-16 जागा मिळू शकतात.

केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केले होते. यासोबतच लडाख वेगळे करून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. यापूर्वी राज्यात विधानसभेच्या एकूण 83 जागा होत्या, त्या नव्या सीमांकनानंतर 90 झाल्या आहेत. त्यापैकी जम्मू प्रदेशात 43 तर काश्मीर प्रदेशात 47 जागा आहेत. यावेळी निवडणुकीत भाजप, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, काही नवे पक्ष आणि अपक्ष उमेदवारही मोठी भूमिका बजावू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.