Manoj Jarange: “आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळं तात्काळ आचारसंहिता देखील लागू राहिली आहे.
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis esakal
Updated on

जालना : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळं तात्काळ आचारसंहिता देखील लागू राहिली आहे. पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाचे आंदोलक जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis
Vidhan Sabha election: राज्यात आजपासून आचारसंहिता लागणार? विधानसभेच्या तारखांची होणार घोषणा?

निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आवाहन केलं की, मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं, एकही मतदान वाया जाता कमा नये. कारण आता अशी वेळच आली आहे. त्यांना (भाजप) आपल्याला संपवायचं आहे. विधासभेसाठी आता वेगानं आपल्याला ताकद दाखवायची आहे. #ElectionWithSakal

Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis
Maharashtra Vidhan Sabha Election : 'या' सुविधांचा लाभ घेऊन अपंग व्यक्तीही बजावू शकतात मतदानाचा हक्क

जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन

मागण्या मान्य करायच्या की नाही हे तुमच्या हातात होतं कारण तुम्ही सत्तेत होतात. पण आता मतं द्यायची की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. आमची लेकरं भिकारी बनवण्यासाठी मी सर्व शक्ती  लावली. आमची लेकरं सत्तेत बसली नाही पाहिजेत यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्तीवर बसून द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसत नाही आणि आताही बसत नाही. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजुला ठेवून ते कधीच सत्तेत येऊ शकत नाही.

कारण इथं प्रश्न नुसता मराठ्यांचा नाही. इथं प्रश्न मुस्लिमांचा गोरगरीब दलितांचा आहे. विशेष म्हणजे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तसंच इथं अठरापगड जातीचे लोक आहेत इथं गोरगरीब ओबीसींचा, धनगरांचा प्रश्न आहे.

Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis
Jharkhand Vidhan Sabha Election 2024: झारखंडची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात; असा असेल इलेक्शन कार्यक्रम

मराठ्यांचं १०० टक्के मतदान झालं पाहिजे - जरांगे

माझी हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की आता आपल्या समाजाला तुम्ही बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आत्तापर्यंत तुम्ही सभेला जाऊन करोडोची ताकद दाखवली. यावेळी १०० टक्के मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एकाही मराठ्याचं मतदान घरी राहता कामा नये, एकही मतदान वाया जाता कामा नये, कारण शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या मुलांची आहे, अशा शब्दांत मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.