Champions Trophy 2025 - हम अच्छे लोग है...! भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये यावे, Shoaib Malik ची विनवणी

Champions Trophy 2025 Shoaib Malik - भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये पाठवणार नसल्याचा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे. PCB ने आयसीसीकडे विनंती केली आहे.
Shoaib Malik Wants India To Travel Pakistan
Shoaib Malik Wants India To Travel Pakistansakal
Updated on

Shoaib Malik wants the team India to travel to Pakistan - पाकिस्तानमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी ( Champions Trophy ) स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थितीमुळे भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले आहेत. त्यामुळे IND vs PAK मालिकाही होत नाहीत. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) आयसीसीला यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यात आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यानेही विनवणी केली आहे.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक यालाही भारतीय संघाने पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात यावे, असे वाटते. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी त्यांनी ICC कडे हायब्रिड मॉडेलचा पर्याय ठेवल्याचे वृत्त आहे. २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणे भारतीय संघाचे सामने पाकिस्तानबाहेर व्हावेत अशी BCCI ची मागणी आहे. १९ फेब्रुवारी २०२५ पासून या स्पर्धेला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

Shoaib Malik Wants India To Travel Pakistan
IND vs SL 1st T20I : ब्रेकिंग! भारताचा प्रमुख खेळाडू सराव सत्रात जखमी, पहिल्या सामन्यात खेळण्यावर शंका

भारतीय संघ २००८ च्या आशिया चषक स्पर्धेनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. मागील १६ वर्षांत शेजारी देशांमधील राजकीय संबंध अधिक ताणले गेले आहेत. पण, या कालावधीत पाकिस्तानचा संघ चारवेळा भारत दौऱ्यावर आला आहे.

भारतीय संघ नकार देत असल्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर जाईल अशीही भीती PCB ला आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उप विजेत्या संघाचा कर्णधार मलिक याने भारतीय संघाला निमंत्रण दिले आहे. मागच्या वर्षी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता आणि आता तुम्ही आम्हाला आदरातिथ्याची संधी द्यावी, असे मलिक म्हणाला.

Shoaib Malik Wants India To Travel Pakistan
IND vs SL : जो बोलते है ना...! Suryakumar Yadav कोच गौतम गंभीरसोबतच्या नात्यावर व्यक्त झाला Video

“देशांमध्ये जी काही हेवेदावे आहेत, ती एक वेगळी समस्या आहे आणि ती स्वतंत्रपणे सोडवली पाहिजे. खेळात राजकारण येऊ नये. पाकिस्तानचा संघ गेल्या वर्षी भारतात गेला होता आणि आता भारतीय संघासाठीही ही चांगली संधी आहे. मला वाटते की भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे पाकिस्तानमध्ये खेळलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप चांगला अनुभव असेल. हम बहुत अच्छे लोग हैं (आम्ही चांगले लोकं आहोत). आम्ही खूप आदरातिथ्य करणारे लोक आहोत, त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय संघ नक्कीच आला पाहिजे,” असे मलिकने सांगितले.

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने यापूर्वी अनेकदा पाकिस्तान दौरा केला आहे. त्याने भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊ नये असे ठाम मत मांडले आहेत. ''भारतीय संघाने पाकिस्तानात का जावे? तिथे सुरक्षेबाबत चिंता आहेच. तेथे दरदिवशी काहीना काही घडतंय. हा देश सुरक्षित नाही. बीसीसीआयचा निर्णय योग्य आहे,''असे भज्जी म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com