Samruddhi Express Way : ‘समृद्धी’वर डुलकीचे ४४ बळी

राज्यातील बहुचर्चित, समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वी वाढत्या अपघातांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
Samruddhi Express Way
Samruddhi Express Way esakal
Updated on

नाशिक - राज्यातील बहुचर्चित, समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वी वाढत्या अपघातांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये ४७ प्राणांतिक अपघातांमध्ये १०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, या अपघातांमागे वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करतानाच, वाहन चालविताना ‘डुलकी’ लागल्यानेच अपघात झाल्याचे समोर आले असून, सर्वाधिक अपघात हे पहाटेच्या वेळेत झालेले असून, त्यात ४४ बळी गेले आहेत.

मुंबई ते नागपूर अशा ७१० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच सतत होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०१३ या आठ महिन्यांदरम्यान, ७२९ अपघात झालेले आहेत. या अपघातांमागे एकच एक कारण नाही. परंतु जी काही कारणे तज्ज्ञांच्या पाहणीतून समोर आले आहे, ती सर्व मानवी चुकांमुळेच अपघात झाल्याची आहेत.

‘समृद्धी’वर वेगमर्यादा दिलेली असतानाही त्यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालविताना वाहनांच्या स्थितीचा व क्षमतेचा विचार वाहनचालक करत नाहीत. परिणामी, भीषण अपघाताला सामोरे जावे लागते.

शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त वेळ वाहन चालविण्याने येणारा थकवाही अपघातांना कारणीभूत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढल्याचे महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.