मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता आपलं सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाहीत. तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भातील जीआर काढला आहे. पण यामुळं आपलं सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.