गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले नेते मनोज जरांगे पाटील हे वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असतात. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषणाचे हत्यार वापरून राज्य सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. यादरम्यान जरांगेंनी नुकतेच 'सरकारनामा'साठी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी उपोषणादरम्यान त्यांच्या उर्जेचा स्त्रोत काय होता याबद्दल भाष्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील जेव्हा जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या सोबत मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील ठेवलेली असे. आता जरांगे यांनी उपोषण करतेवेळी आपण जगत नाही असं वाटू लागलं की, आपण शिवरायांच्या पायांना स्पर्श करायचो आणि त्यामधून तीन-चार तास तरी उर्जा मिळत असे म्हटले आहे.
जरांगे म्हणाले की, मला जेव्हा जेव्हा असं वाटायचं की मी आता राहात नाही, त्यावेळी मी छत्रपतींना हात लावायचो. मला जाणीव व्हायची की मी आता माझ्या समाजात राहात नाही, त्यावेळी मी कसाबसा उठायचो आणि माझ्या छत्रपतींच्या पायांना हात लावायचो. मला त्यादिवशी शंभर टक्के जाणीव व्हायची की मी जाणार आहे. मला फक्त समाज दिसायचा... देवा मला सगळं काम होईपर्यंत जाऊ देऊ नको अशी विनंती करायचो. जेव्हा मी पायांना हात लावायचो, तेव्हा तीन चार तास तरी माझे सहज पोटातील आग बंद व्हायची"
"हे पटणार नाही लोकांना, त्यांना वेगळं काहीतरी वाटेल. मला माझी उर्जा माहितेय, माझा राजा माझ्या पाठिशी आहे." असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.