Manoj Jarange Patil : "फडणवीससाहेब मराठ्यांना डिवचू नका... "; मनोज जरांगेंनी गंभीर आरोप करत का दिला इशारा?

Manoj Jarange on Devendra Fadnavis: मनोज जरांगे यांनी जाहीर केले की, ते २० जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, "माझा समाज अडचणीत आणायचा नाही, मला माझा समाज मोठा करायचा आहे. एक गेला तरी चालेल, पण लाख जगले पाहिजेत म्हणून आमरण उपोषण सुरू करतो."
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal
Updated on

जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेता मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना इशारा दिला की, "मराठ्यांना डिवचू नका". त्याचबरोबर, त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरही भाष्य केले.

प्रकाश आंबेडकर आणि गरीबांच्या बाजूने

मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांची प्रशंसा करताना म्हटले की, "प्रकाश आंबेडकर गरीबांच्या पाठीशी उभे राहणारे नेते आहेत. त्यांनी गोरगरीबांच्या बाजूने राहावे अशी अपेक्षा आहे".

शरद पवार यांच्यावर टीका

शरद पवारांवर टीका करताना जरांगे म्हणाले की, "मराठ्यांचे किती हाल झाले आहेत हे बऱ्याच जणांना माहित नाही. त्यांना फक्त मतं मिळवायची असतात. मराठ्यांच्या महिला तासंतास लेकरं घेऊन उभ्या असतात, हे कोणाला दिसत नाही."

देवेंद्र फडणवीस यांना इशारा-

फडणवीसांवर टीका करताना जरांगे म्हणाले, "जे आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत होते, ते बैठकीतून बाहेर पडल्यावर आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांना डिवचू नका. तुम्हाला आणि छगन भुजबळांना महाराष्ट्रात अराजकता माजवायची आहे."

Manoj Jarange Patil
Ajit Pawar: "पोटात गोळा आलेला पण फडणवीस होते निवांत"; अजितदादांनी सांगितला हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्यानंतरचा अनुभव

राज ठाकरेंना सल्ला

राज ठाकरे यांनी जातीपातीचे विष नष्ट करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. यावर जरांगे म्हणाले, "फडणवीस साहेबांच्या बंगल्याकडे जरा लक्ष द्या. राज ठाकरे साहेबांनी लक्ष दिले तर खूप चांगले होईल. त्यांनी जातिवाद बंद करण्याचे आवाहन केले आहे."

२० जुलैला आमरण उपोषण

मनोज जरांगे यांनी जाहीर केले की, ते २० जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, "माझा समाज अडचणीत आणायचा नाही, मला माझा समाज मोठा करायचा आहे. एक गेला तरी चालेल, पण लाख जगले पाहिजेत म्हणून आमरण उपोषण सुरू करतो."

Manoj Jarange Patil
Shivaji Maharaj Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं मुंबईत दाखल! कधी पाहता येणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.