सातारा : आचारसंहिता असल्याने लाडकी बहीण योजना काही महिने बंद केल्याचे सांगत राज्य सरकार खोटे बोलत आहे. राज्य सरकारने ही योजना आर्थिक टंचाईमुळे व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बंद केली असून, राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीने फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.