Prashant Kishor Prediction: प्रशांत किशोर हरियानातील निवडणुकीपूर्वी भाजपबद्दल काय म्हणाले होते? किती ठरले खरे?

हरियाना आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना, सुरुवातीच्या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वाटत होती. हरियानामध्ये काँग्रेस सुरुवातीला आघाडीवर होती, पण नंतर भाजपने जोरदार उभारी घेतली.
Prashant Kishor speaking during an interview about BJP's prospects in the Haryana and Jammu-Kashmir elections.
Prashant Kishor speaking during an interview about BJP's prospects in the Haryana and Jammu-Kashmir elections. esakal
Updated on

हरियाना आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. निकालांपूर्वीच जनसुराज पार्टीचे समन्वयक आणि प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपबद्दल मोठे विधान केले होते. त्यांनी यापूर्वी स्पष्टपणे म्हटले होते की या राज्यांमधील निवडणुकीचे निकाल भाजपच्या सत्तेच्या स्थैर्याला मोठा धक्का देऊ शकतात. त्यांच्या या विधानावर आता सर्वांचे लक्ष लागले होते आणि मतमोजणीचे सुरुवातीचे निकाल हे त्यांचे भाष्य किती खरे ठरत आहे हे दाखवून देत होते.

प्रशांत किशोर यांचे विधान-

सप्टेंबर महिन्यात इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी विधान केले होते की, “9 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल (जम्मू-काश्मीर, दिल्ली, हरियाना, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आणि आसाम) हे भाजप सरकारच्या स्थिरतेला मोठे आव्हान देऊ शकतात. जर भाजप या राज्यांपैकी 5-6 राज्यांमध्ये पराभूत झाले, तर त्यांच्या सत्ता निर्माण करण्यासाठी भाजपसमोर मोठं आव्हान असेल.

किशोर यांनी असेही म्हटले होते की, “2024 लोकसभा निवडणुकीत मोदींनी चांगली कामगिरी केली असली तरी जनता त्यांना संदेश देत आहे की, ते सर्वेसर्वा नाहीत. त्यांना सरकार लोकशाही पद्धतीने चालवायचे आहे, तानाशाही पद्धतीने नाही.”

Prashant Kishor speaking during an interview about BJP's prospects in the Haryana and Jammu-Kashmir elections.
Haryana 2024 election result: हरियानाला मिळणार दलित मुख्यमंत्री? या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा

हरियाना-जम्मू-काश्मीर निवडणुकीतील भाजपची स्थिती

हरियाना आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना, सुरुवातीच्या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वाटत होती. हरियानामध्ये काँग्रेस सुरुवातीला आघाडीवर होती, पण नंतर भाजपने जोरदार उभारी घेतली. निवडणुकीतील ही टक्कर खूप चुरशीची होत आहे, ज्यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेल्या विधानांची सत्यता समोर येऊ लागली.

जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीच्या जवळ पोहोचली होती, पण त्याचवेळी भाजपने देखील काही मोठ्या आघाड्या घेतल्या. या निवडणुकीतील निकाल हे भाजपसाठी एक मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट दिसत होते.

Prashant Kishor speaking during an interview about BJP's prospects in the Haryana and Jammu-Kashmir elections.
निकालापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये गदारोळ! भाजपाला बहुमत मिळाले नाही तर प्लॅन B काय? 5 आमदार बदलवणार सत्ता समीकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.